Saturday, December 28, 2013

स्वामीजी बद्दल...

पूर्वाश्रमीचे नाव : श्री.मनोहर चुनीलाल खैरनार.
जन्म दिनांक : ०३ जुलै १९४६ 
जन्म स्थळ : बेटावद ता.शिंदखेडा जि.धुळे 
स्वामीजी हे मां शक्ती ( दुर्गा देवी ) चे उपासक आहे. मां शक्ती त्यांना साम्यर्थ देते. देवीने बऱ्याचदा दृष्टांत दिला आहे. त्यांची हि अखंड साधना गेली अनेक वर्ष नित्य नियमाने चालत आहे.

स्वामीजी च्या प्रवासाची सुरवात साधारणत १९५९ मध्ये झाली तेव्हा वय साधारण १२-१३ असेल. शाळेत अगदी हुशार विद्यार्थी म्हणून ओळख होती. गावात तसे वातावरण काही वेगळे नव्हते न कधी साधू संन्यासी राहत होते पण त्याच वेळेस तोंडातून एक वाक्य बाहेर पडले " मी मागच्या जन्माचा संन्यासी आहे आणि या जन्मातपण  संन्यास घेणार आहे"  हि खरी सुरवात झाली . खरे तर त्या वेळीस संन्यास म्हणजे काय आणि संन्यासी म्हणजे काय हे काही माहित नव्हते आणि अर्थातच हे शब्द ऐकून घरच्यांना गम्मत वाटली आणि सगळे हसले. त्या वेळीस फक्त शांत होते ते वडील. स्वामीजीमध्ये एक विशेष गुण अंगीभूत होता तो म्हणजे न कधी जेवणाचे लाड न कधी कपड्याचे ह्या करता आई रागवायची कि कधी तुला कपड्यांची काळजी न खाण्यात ( जेवणात खारट , आंबट , गोड, मीठ जास्त असो कि कमी तरी कसली फिर्याद नाही ) मग कधी त्यांच्या आई बोलयाच्या कि तू मागच्या जन्माचा योगी होतास पण योगी म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हते .

      नववीत असताना स्वामी विवेकानंद बद्दल अल्प अशी माहिती असताना त्याच वेळीस शाळेतील सरांनी स्वामी विवेकानंद चे चरित्र पुस्तक  हातात देत म्हटले कि दोन दिवसांत वाचून काढ परवा जयंती आहे. शाळेत एकटे बसले असताना अचानक डोळ्यासमोर दिव्य प्रकाश, समोर स्वामी विवेकानंद उभे. तो भ्रम नव्हता न स्वप्न ना भास . त्याच वेळीस आवाज आला "देश आणि धर्माच्या सेवेसाठी तुला संन्यास घ्यायचा आहे" . पुन्हा हीच घटना स्वामीजी बी एस्सी ला असताना घडली. तेच दर्शन , तेच वाक्य , मनात काही कल्पना नसताना. काही दिवस असेच निघाले एम एस्सी झाले आणि मग नौकरी करू लागले. त्याच काळात अहमदनगरला कॉलेज मध्ये नौकरी करत असताना रात्री अचानक सप्तशृंगी  देवीचे दर्शन झाले व व कधीही न बघितलेल्या मुलीकडे बोट दाखवत आज्ञा झाली " हिच्याशी तुला लग्न करायचे " स्वप्न ज्या सकाळी पडले त्याच दिवशी सकाळी पत्र मिळाले आणि मुलगी बघायला स्वामीजी गेले आणि काय आश्चर्य ज्या मां भगवतीने स्वप्नात मुलगी दाखवली तीच मुलगी समोर. हि घटना १९७२ ची त्याच वेळीस स्वामीजीनी सांगितले कि मी पूर्वजन्मीचा संन्यासी आहे मी पुन्हा कधी संन्यास घेईल  तरी विचार करावा उत्तर मिळाले मी अडवणार नाही . फक्त तुमच्या हाताने मंगळसूत्र गळ्यात घालेल आणि सिंदूर भरेल, हि घटना अगदी आश्चर्यकारक  होती . नगर सोडले पुण्याला आले , लग्न झाले मुलगा झाला. सप्टेबर मध्ये मुलगा २ वर्षाचा झाला त्याच वेळीस जेवत असताना अचानक अंगावर वीज पडावी तसे स्वामी दचकले आणि सगळ्यांचा  एक  प्रश्न काय झाले तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिले मां भगवतीचा आदेश आला आहे एक वर्षाच्या आत घर सोडायचे. मग काय तो सोनियाचा दिन आला आषाढ महिना ( जुलै ).तेव्हा रात्री स्वप्न पडले त्या स्वप्नात एक अत्यंत तेजस्वी दिव्य पुरुषाचे  दर्शन झाले त्यात स्वामीजींच्या  डोक्यावर हात ठेवून त्या दिव्य पुरुषाने विचारले "अजून किती दिवस घरात राहायचे आहे ? चल मी तुला घ्यायला  आलो आहे " नंतर ते वर्णन स्वामीजींच्या  वडिलांनी  ऐकले व सांगितले कि दुसरे कोणी नसून "ते माझे गुरु महायोगी वल्लीनाथ महाराज आहे. त्यांची आज्ञा झाली तर तू जा " हे शब्द ऐकून आईला खूप रडू आले खूप समजवले पण वडील शांत होते. स्वामीजी त्या वेळीस किर्लोस्कर कंपनी मध्ये कामास होते. तीन महिने निघून गेले घरातील वातावरण शांत होते. 
     अश्विन महिना , नवरात्र संपली. दुसऱ्या दिवशी दसरा. अगदी आनंदाचा दिवस पण पहाटे आई उठल्या ते रडतच सगळ्यांना काही काळात नव्हते नंतर आईनी झाला प्रकार सांगितला  कि त्यांना  गुरु आज्ञा झाली व त्या प्रमाणे आईनी परवानगी दिली. ह्याच वेळात नौकरीचा राजीनामा द्यायचा होता. पैश्याचे देणे-घेण्याचे हिशोब करून सगळ्यांची पुढची व्यवस्था लावणे.आई वडिलांची जबाबदारी , लहान भावाला सांभाळणे , खूप कामे होती. त्यात नौकरीच्या जागी लगेच सोडू शकत नाही पण ते हि काम नीट झाले व २ डिसेंबर १९७६ हा कंपनी चा शेवटचा दिवस . ३ डिसेंबर १९७६ घर सोडायचा दिवस व आता पुण्याहून आपल्या जन्मगावी बेटावद ( धुळे ) जायचे . त्याच दिवशी स्वामीजी न त्यांच्या वडिलांनी एक रहस्य उलगडले क़ि गुरुनी त्यांना सांगितले होते कि तुझ्या घरी मागच्या जन्माचा एक योगी जन्माला येईल, शिकेल , नौकरी करेल संसार करेल आणि एक दिवस अचानक घर सोडून निघून जाईल त्याला घ्यायला मीच  येईल . ( पण स्वामीजींच्या जन्माच्या ४ वर्ष आधीच वल्लीनाथानी देह त्याग केलेला  सन १९४२)  मग वडिलांनी सांगितले कि  ज्ञानेश्वरी वाचून दाखव तिथपर्यंत आपला संबंध, नंतर नाही. मग वडिलांच्या आज्ञा प्रमाणे आवश्यक सामानाची ( १ जोडी कपडे , टॉवेल , ज्ञानेश्वरी , आसन  ) मग वडिलांना विचारून ज्ञानेश्वरीचा कोणता  अध्याय वाचायचा हे विचारले व सांगितले कि डोळ्यासमोर ज्या ओव्या असतील त्यापैकी दहा ओव्या वाच मग अजून एक लीला झाली ज्या ओव्या वाचल्या त्या म्हणजे " जेथिचिये अनित्यतेचि थोरी |  करीतया ब्रम्हयाचे आयुष्यवेरी | कैसे नाही होणे अवधारी | निपटूनिया | हे ऐकून वडील चमकले कारण ज्ञानेश्वरी त्यांची अगदी कंठस्थ होती आणि स्वामी हि रोज ३०० ओव्या वाचायचे २ वर्षा पासून . आणि ते पुढचे ओव्या समजले आणि त्यांचा संयमाचाबंध सुटल व पोटाशी धरले व म्हटले कि घर सोडण्यापूर्वी भगवंतानी तुला आशीर्वाद दिला. माझ्या गुरुमहाराजांची आणिमाउलींची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. प्रेमाने शेवटचा हाथ फिरवला व नमस्कार करून कोणाकडे न बघता घराबाहेर पडले तो दिवस होता ३ डिसेंबर १९७६ मग नवीन यात्रेची  सुरवात झाली. पुणे सोडले व जन्मभूमीत म्हणजे बेटावद ( जिल्हा धुळे) येथे आले व सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ६ डिसेंबर १९७६ दत्तजयंतीला गृहस्थाश्रमातील सर्व नात्यांची बंधन कापून गुरूच्या शोधत पायी प्रवास सुरु केला पायी प्रवासात राहण्याचा, जेवणाचा, झोपण्याचा कधी प्रश्न आला नाही. कारण योगीराज वल्लीनाथांची कृपा तसेच वडिलांनी  पूर्व आयुष्यात केलेल्या सत्कर्माचे फळ. त्यांना काय मिळाले हे माहित नाही पण पण ते स्वामीजींना मिळाले

     साधारणत एक महिन्यानंतर गिरनारला पायी प्रवास करत पोहचले 'दत्ताशिखर'   दत्तांच्या चरण पादुका! अधिकारी गुरु मिळावे; कुठे फसगत होऊ नये म्हणून दत्तांच्या शरणी. तेथील गदिपति अमृतगिरी महाराज हे नव्हते पण तेथला कारभार रामानंदगिरी बघत तिथे एक गुरुजींची भेट झाली ती भेट आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि जीवनदृष्टीसाठी  त्यांचे मोलाचे व न विसरणारे उपकार झाले. आध्यात्माचे प्रचंड ज्ञान , रोज गुरुचरित्र वाचन, अध्यात्मातील गूढ रहस्य उलगडून सांगण्याची त्यांची विलक्षण हातोटी. तिथे अगदी पुत्रवत स्नेह मिळाला. त्यांचा व स्वामिजीचा संबंध तीन जन्मापासून आणि तिथे गुरूजवळ जाण्याआधी चांगली पूर्व तयारी करून घेतली. तिथे त्रिपुरा रहस्य, भगवदगीता , उपनिषद आध्यात्मिक ज्ञान समजून सांगितले कधी गुरुचरित्रावर सत्संग. एकदा असेच रामानंदगिरी  सोबत भांडण झाले आणि खाली उतरत असताना अमृतगिरी बापूंची भेट झाली. डोळ्यात अश्रू आले त्यांना वंदन केले  त्यांनी स्वामीजीना पुन्हा परत यायला सांगितले पण ह्या रागात गुरुजींना न सांगता ते खाली उतरले म्हणून गुरुजीना पण खूप वाईट वाटले .  पण पुन्हा ४-५ दिवस त्यांनी जवळ घेऊन सांगितले कि दत्ताकृपेने अल्पशा सेवेने संतृष्ट होऊन वाचासिद्धी दिली आता परीक्षेची घडी व सांगितले कि प्राप्त झालेली  सिद्दी जर लोकांकरिता वापरली तर तुझा मोठा मान-सन्मान होईल दर्शनाला मोठ्या रांगा लागतील पण तुला काय मिळेल ? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे " ज्या पायावर लोक डोक टेकवतील ते पाय इथेच जळून राख होतील, ते पाय तुझ्या बरोबर येणार नाही विचार कर तुला काय मिळेल " ह्याच शब्दांचा खूप परिणाम झाला फक्त त्या दिवशी नाही तर कायमचा. त्या नंतर गुरुजींनी या सिद्धीतून मुक्ती करिता दत्ताचारण पादुकाजवळ  नेले व मंत्र म्हणत व हातातले जल दत्त पादुकावर सोडायला सांगितले व संकल्प केला नंतर मन खूप हलके वाटले व  प्रसन्ना वाटायला लागले. 

     नंतरच्या काळातही दत्ताशिखरवर . नंतर साधनाकाळात हृषीकेशमध्ये गुरु  महाराजंच्या सेवेत असताना किती तरी प्रकारच्या सिद्दी येत राहिल्या पण प्रत्येक वेळी गुरुजींचे शब्द कानावर यायचे.  गुरुजींचे महान उपकार आहे.  रामानंदगिरी  सोबत भांडण झाले व खाली उतरताना जर कोणी नसते अडवले तर आज काय झाले असते हे विचार करून स्वामीजींनी अंगावर काटा येतो.  तसेच अजून एक कृपा झाली ती म्हणजे कमंडलू कुंडाच्या सेवेत कोणीही स्री नव्हती. गुरुजींनी वैराग्यसंबंधी नवी दृष्टी दिली आणि ती आज हि तशीच आहे हे आपण स्वामीजी कडे बघून समजतो.  तिथे असताना अमृतगिरीबापूचे वागणे कायम विचित्र वाटत असे १०-१२ मिनिटात बिडी पिणे अर्ध्या-अर्ध्या तासात घोटभर चहा. एकीकडे ते ब्रम्हनिष्ट वाटायचे कधी अर्धवट. व्यवस्थित बोलणे क्वचित बरगळने जास्त .  मग मनात शंका आली  नंतर गुरुजींनी त्याचे समाधान केले व दाखवले त्यांचे समाधी अवस्थेतील तेज . मग मनात विचार आले कि जी व्यक्ती दिवसभर पागलसारखी, विचित्रसारखी का वागते ? कशासाठी ? मग गुरुजीने सांगितले कि ज्ञानेश्वरी वाच पण तेव्हा त्याच अर्थ कळला नव्हता तसे स्वामीजी रोज ३०० ओव्या रोज वाचत. मग गुरुजींनी सांगितले कि अमृतगिरी बापू खूप मोठे अधिकारी सत्पुरुष आहेत. दत्त साक्षात्कारी ब्रम्हनिष्ट संत आहेत. नंतर गुरुजींनी आत्मज्ञानी पुरुषांच्या वेगवेगळ्या अवस्थांचे "बाल , उन्मत व पिशाच्य " वर्णन करून सांगितले. अनेक रहस्य उलगडली. तसेच नीट बघितल्यावर कळले कि बापू कधी बिडी पितच नव्हते. मग खुपदा निरीक्षण करून बघितले त्या दिवशी कळले कि ज्या दृष्टीने आपण बघतो ते वेगळेच . नंतर एक दिवस भाग्याचा दिवस उजाडला व बापूनी सेवेस बोलावले त्याच वेळी डोक्यात विचार चालू होते कि आपले गुरु कोण आहेत ? कुठे आहेत ? कधी भेटतील ? मनात विचार आला आणि बापूनी डोळे उघडले व रागावल्याचे नाटक करत म्हणाले "तू माझे पाय दाबतो कि गुरूला शोधतो आहेस?" तेव्हा आश्चर्य वाटले त्यानंतर  जाण्यास सांगितले नंतर प्रेमाने आवाज आला हे पहा शांतीने भगवान दत्तात्रायंची सेवा कर वेळ आली कि सगळे सांगू."

      मागच्या जन्माचे काही सुकृत असेल, या तीन अधिकारी संतांची विशेषकृपा  लाभली. त्याशिवाय अजूनही काही ब्रम्हज्ञानी निजानंदात  मग्न  संतांचे दर्शन घडले त्यांचे दर्शन घडले पण सहवास लाभला नाही. पण अगदी थोडा सहवास लाभला निजानंदात मग्न अशा ऋषिकेश निवासी लक्ष्मणदास अवधूत या संतांचा. त्यांनीच सांगितले कि "बेटा तुझे तीव्र जिज्ञासा है तो एक दिन  गुरु  जरूर मिलेगा धीरज रखो मुमुक्षत्व और तितिक्षा तीव्र हो " भाग्याने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, एक तास सत्संग झाला. भाग्यानेही कोणाला लवकर मिळत नाही ते स्वामीजीना मिळाले. तिथे खूप अनुभव मिळाले आणि त्याच अनुभवाची पुढे खूप मदत मिळाली. गुरु महाराजांनी घेतलेली परीक्षा त्यात टिकून राहायची पूर्वतयारी. आधी गुरुजींनी नंतर संतश्री लक्ष्मनदास  अवधुतानी करून घेतली. या पूर्वीच्या पायी प्रवासात अनेक ठिकाणी आश्रमाधिपती , महामंडलेश्वर यांनी आडवळणाने , शिष्यामार्फत किवा स्वत:च स्पष्टपणे सुचवले होते पण लक्ष्मनदास अवधुतानी तसे सुचवले नाही . यामध्ये हा महत्वाचा एक फरक.  ह्या जन्माचे असो कि मागच्या जन्माचे पुण्य पण ब्रम्हलीन वल्लीनाथ महाराज गुरुजी व अमृतगिरी बापूंची कृपा लाभली.

     स्वामीजी गुरु महारांच्या चरणी कसे पोहचले व त्याची कसोटी कशी घेतली हे थोडक्यात लिहतोय. स्वामीजींना जे तीन सत्पुरुष म्हणजे महायोगी वल्लीनाथ , गिरनारला भेटलेले  गुरुजी व संत अमृतगिरी . वल्लीनाथ हे इंदूरचे महायोगी माधवनाथांचे पट्टशिष्य . आई - वडिलांचे गुरु त्यांच्याच कृपेने व प्रेरणेने गृहत्याग सहजासहजी घडला.  प्रत्यक्ष दर्शनाचा योग तर नाही घडला कारण जन्माच्या आधी शरीरत्याग  केला होता . त्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली स्वामीजी पुण्यात असताना महिन्यातून किमान एकदा तरी आळंदीला माउलींच्या दर्शनाला पायी ते पण अनवाणी जायचे. माउलीना एकच मागणे कि तुमच्या सारखा योगीराज गुरु द्या. त्यासाठी निदान दोन वर्ष तरी पायी गेले. नंतर प्रत्यक्ष शोधत निघाले. नवीन असताना गुरुवार करायचे नंतर गुरुचरित्र पारायण. गाणगापूर-नृसिंहवाडी- औदुंबराची यात्रापण झाली होती. दत्त आपल्यावर कृपा करतील व योग्य मार्ग दाखवतील कोठे फसवणूक होऊ देणार नाही म्हणून म्हणून गिरनार ला जायचे ठरवले होते.  रस्त्यात व तिथे खूप अनुभव तर आलेच सोबत मजेशीर अनुभव हि आले. 

     पायी प्रवासात आत्मज्ञानी संतांचे दर्शन हि झाले त्या बाबतीत स्वामीजी खूप भाग्यवान.  त्यातच एक म्हणजे बाबा जोगळेकर ( नर्मदा किनारी राहणारे कधि काळी स्वामींच्या घरी जेवायला  येणारे ) , गिरनारचे  संत  अमृतगिरी बापू , तीर्थराज प्रयागमध्ये सच्चा बाबा महर्षी महेश योगी , ऋषिकेश ,  हरिद्वार व कनखलमध्ये  लक्ष्मनदास अवधूत , मस्ताराम बाबा , मा आनंदमयी , वृंदावनचे  पागल बाबा , ऋषिकेशच्या  वास्तव्यास असताना डिव्हाईन लाइफचे  शिवानंदाचे उत्तराधिकारी पू. चिदानंद व एक दुसरे महान संत सितारामदास ओकारनाथ त्या वेळी ऋषिकला नव्हते त्या मुळे दर्शन घडले नाही. जे ब्रम्हनिष्ठ होते हे कळते पण गुरु करायची मनात ओढ नसायची त्याला कारण गिरनार चे वास्तव्य , तेथील अनुभव ,  ह्या आधी सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी तीन जन्माचे नाते सांगितले होते. तसेच पुढच्या मार्गाची तयारी करून घेतली होती. तसेच गुरुपर्यंत पोहोचण्याचा उपाय हि सांगितला होता. तसेच एकदा ध्यानात बसवून एक मंत्र  हि दिला त्याने ध्यानात गुरूंचे दर्शन झाले एक अत्यंत तेजस्वी वामन मूर्ती , संन्यास वस्र, मुंडण केलेली पाठीशी आशीर्वाद देत उभी आहे. पण त्यांना शोधायचे कसे व कुठे ? एके दिवशी गिरनारवर धो-धो पाऊस पडत होता अचानक अमृतगिरी बापूनी अचानक हाक मारून सांगितले चल तू आता खाली उतर,  उत्तरेला जा . तुझे गुरु ऋषिकेशला गंगा किनारी वाट बघत आहे.  त्यांनी पैसे दिले पण पैसे न घेताच पायी प्रवास  सुरु केला. पायी प्रवासात ऋषिकेशला  पोचायच्या आधी मथुरा - वृंदावन तीर्थस्थानांचे दर्शन करीत मथुरेला डोंगरे महाराजंची सात दिवस भागवत कथा ऐकली.  ऋषिकेशला पोहचत एक महिन्याचा काळ लागला तोपर्यंत गुरु महाराज आपल्या स्थानी ( छापरा- बिहार )  निघून गेले होते .नंतर त्यांची भेट झाली व फक्त दोन प्रश्न विचारले कि बाबा  तुम्ही गिरनारला कधी गेला होता ? ह्यावर ते हसून म्हटले कि "दोन वर्षापूर्वी"  दुसरा प्रश्न विचारला कि तुम्ही श्रावण महिन्यात कुठे होते पुन्हा हसून सांगितले कि " ऋषिकेश गंगाकिनारी "  दोन शब्दात उत्तर  तिथे बघितले कि एक मंदिर आहे पण ते कोण दुसरयाचे. त्यांनी राहायला अनुमती दिली. तिथे एवढ्या थंडीत जानेवारीचा  पहिला आठवडा काही अंथरायला नाही, पांघरायला नाही , रात्री खायला मिळाले नाही तरी काहीहि न बोलता रात्री फरशीवर तसेच शांतपणे झोपणे . त्या वेळीस एक दिव्य आत्मा सिद्धयोगी ( सिद्ध लोकातून ) प्रकट झाले व म्हणाले आम्ही ( महायोगी वल्लीनाथ )  याला पुण्याहून तुमच्या शरणी येथपर्यंत आणून पोचवले याचा स्वीकार करा .  त्याच वेळी मा भगवती व भगवान दत्तात्रयांनीपण  दर्शन देऊन हेच सांगितले. महाराजांनी चरणी आश्रय तर दिला पण कठोर परीक्षा अजून सुरु व्हायची होती.  १५ दिवसा नंतर गुरु महाराजांनी अंथरण्यासाठी  २ गोणपाठ मागवले बस. स्वयंपाकासाठी भिक्षा ( शिधा) मागून आणायची . झाडाच्या वाळलेल्या काड्या , जुनी खोकी. 

    पंधरा दिवसांनी एक जागा घेतली तिथे स्व:त गुरु महाराज राहायला येणार होते ( आश्रम ) ते शेतीची जमीन शहरापासून ३-४ कि. मी दूर . कच्चा रस्ता संध्याकाळनंतर रात्रभर त्या रस्त्यावर साप- नाग फिरायचे. संध्याकाळनंतर कोणी त्या रस्त्याला फिरायचे नाही . त्या रस्त्याला लागून आश्रमासाठी जमीन. जमिनीत एक नाला. त्यात खूप काटेरी झाडे. साप- विंचवांची गणती करण्याचा प्रश्न नाही. गुरुमहाराजंच्या  आज्ञेने त्या नाल्यातील काटेरी झाडे- झुडपे फावड्याने व कुऱ्हाडीने  दूर करायची आसपास मिळेल तेथून माती आणून तो नाला भरायचा. कोणी मदतीला नाही ना पैसे. सुरवातीला भयावह साप - विंचूचे  भयावह दर्शन झाले  दर्शन ते बघून  कोणालाही भय येईल असे त्या काळी न कुठली साधना न भयमुक्ती झालेली नुकताच गृहस्थाश्रम सोडलेला फक्त एक वर्ष एक महिना झालेला. रात्री झोपायला काही नाही बाजूला सापांचा सुळसुळाट  तरी थकव्याने ईश्वरावर व गुरुमहाराजंवर  पूर्ण श्रद्धा ठेवून शांत झोपणे. सकाळी उश्याजवळ नाग फणा काढून डोलत होता. पण उठल्या नंतर तो निघून गेला . पण पलंगाखाली फणा काढून बसायचा. जणू काही साप-नाग-विंचू व इतर प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी ते बसायचे. गुरुमहाराजांचा अधिकार ,सामर्थ्य,  संतपुरुषाच्या  विलक्षण लीलेचा अनुभव झाला. होळीच्या आता कुटी बांधून झाली नंतर गुरु महाराजांना घेऊन आले. नंतर गुरु कृपेने स्वामीजींना एक झोपडी तयार केली. गुरुमहाराजंच्या जवळ राहण्याचा त्यांची सेवा करण्याचा तो जीवनातील सर्वोच्च्य आनंदाचा अविस्मरणीय क्षण होते. गुरुमहाराजांच्या करुणेचा , प्रेमाचा , अविरत सतत धारेचा , मृद, शांत , सौम्य स्वभावाचा अनुभव मिळत होता. म्हणजे गुरु करुणा कशी असते ते कळले. 

स्वामीजींना अनेक अनेक अनुभव आले तसेच मा भगवती व गुरुकृपेने जीवन धन्य झाल्याचा आनंद चेहऱ्यावर बघू शकतो. ह्या प्रवासात अनेक घटना घडल्या अनेक साधू भेटले आणि काही गमती पण कळल्या.

( पुढील काही महिन्यात अजून अनुभव प्रसिद्ध केले जातील जे  आपणा सगळ्यास प्रेरणादायी ठरेल  )

Tuesday, December 17, 2013

स्वामी सवितानंद

                                                         जय गुरुदेव 



स्वामीजी दंडवत प्रणाम !

स्वामीजी आपणा बद्दल लिहावे असे मनात  खूप इच्छा होते पण काय व कसे लिहावे हे समजत नव्हते. पण आज हिम्मत करून थोडक्यात लिहतोय आणि मला आशा आहे स्वामीजी मला माफ करतील..
स्वामीजी मी आपल्या श्रीचरणाला "मीतूपणा" चा भाव सोडून नमस्कार करीतो. स्वामीजी आपल्याबद्दल लिहणे म्हणजे हे काही सहज नाही पण तरी थोडक्यात काही लिहण्याचा हा प्रयत्न. स्वामीजी आपले दर्शन जो घेतो त्याच संसार सुखाचा होतो आपले क्षणमात्र दर्शन झाले तरी विघ्न दृष्टीस पडत नाही. .स्वामीजी आपण बुद्धीला प्रकाश देणारे आहत. आपल्या वाणीच्या ठिकाणी साक्षात सरस्वती वास करते. स्वामीजी आपण सर्व मनोरथ करणारे आहात. आपली सेवा मिळावी हि खूप इच्छा आहे. मी जाणतो कि गुरु सेवा केल्याने मनातील सर्व मनोरथ सिद्धीस जातात. ज्या प्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातल्याने सर्व फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात किवा जितकी तीर्थ आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एका समुद्रात स्नान केल्याने होते अथवा अमृत रसाचे सेवन केले असता सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होते. त्याच प्रमाणे इच्छित कामना पूर्ण करणारे स्वामी, श्रीगुरू आपणच. आपणास पुन: पुन: अभिवंदन करतो.

”गुरू” या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।” असे वर्णन करून त्याला नमन केले आहे.( ह्यावर आपण खूप लिखाण केले आहे म्हणून वेगळे काही लिहण्याची गरज नाही ) 
 यात गुरूला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात, “गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।” इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. गुरुलाच साक्षात देवाच्याही आधी वंदन असो असे सांगणारे भक्त शिरोमणि कबीर होऊन गेले - ते म्हणतात “गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय|”- गुरु आणि गोविंद असे दोघेही माझ्यासमोर उभे ठाकलेत, तर मी आधी कुणाच्या पाया पडू? आणि उत्तर सांगतात “बलिहारी गुरु आपनी - जिन्ह गोविंद दिया बताय||” हे गुरुवर्या आधी तुमच्याच पाया पडणार, कारण तुमच्यामुळेच मला गोविंद समजला - परमात्म्याचं स्वरुप समजल. गुरुर्ब्रह्मा - गुरु हाच ब्रह्मदेव आहे, गुरुर्विष्णु: - गुरु हाच विष्णु आहे, गुरुर्देवो महेश्वरः - गुरु हाच देवाधिदेव महादेव पण आहे. गुरु हाच साक्षात्‌ परब्रह्म देखील आहे. तस्मै श्री गुरुवे नमः - म्हणून अशा या श्री गुरुला माझे नमन असो. 

 “परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ.” असे दुस-या एका ठिकाणी म्हंटले गेले आहे. “गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।”, “बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ” यासारखी कांही पदेही आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण कांहीच करू शकत नाही.

एक फार जुनी बंदिश आहे - गुरु बिन कैसे गुण गाऊँ, गुरुने शिकवले नाही - ज्ञान दिले नाही तर मी परमेश्वराचे गुण वर्णन तरी कसे करु? ज्ञानदेव म्हणतात -- 
हे अपार कैसेनी कवळावे
महातेज कवणे धवळावे
गगन मुठी सुवावे 
मशकें केवी ? 
परी एथ असे एकु आधारु 
तेणेची बोले मी सधरु 
जे सानुकूळ श्रीगुरु 
ज्ञानदेवो म्हणे 
हे गीतेचे अपार तत्वज्ञान म्हणजे सूर्याला उजाळा देण्यासारखे किंवा चिलटाने आकाशा मुठीत धरण्यासारखे आहे- तरी पण मला आधार आहे तो अनुकूल असलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा, म्हणूनच मी हे करु शकेन.
थोडक्यात सांगायचे तर ज्ञानाच्या कक्षा, त्याच बरोबर कर्तृत्वाच्या कक्षा उंचावण्यासाठी आपल्याला गुरुच पुढे घेऊन जातो आणि आपण माझे गुरु आहात.  गुरु महिमा अगाध आहे. मी आपणास गुरुरुपात बघतोय. 
स्वामीजी आमच्यात दोष आहे म्हणून जन्म आहे तरी ह्या जन्माचे सार्थक करावे हि विनंती 

संत कबीरांच्या काही ओवी मुद्दाम लिहतोय ज्या अगदी सत्य आहेत. 


कुमति कीच चेला भरा, गुरु ज्ञान जल होय |

जनम - जनम का मोरचा, पल में डारे धोया ||
गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढ़ि - गढ़ि काढ़ै खोट |
अन्तर हाथ सहार दै, बाहर बाहै चोट ||
गुरु समान दाता नहीं, याचक शीष समान |
तीन लोक की सम्पदा, सो गुरु दीन्ही दान ||
जो गुरु बसै बनारसी, शीष समुन्दर तीर |
एक पलक बिखरे नहीं, जो गुण होय शारीर ||
गुरु को सिर राखिये, चलिये आज्ञा माहिं |
कहैं कबीर ता दास को, तीन लोकों भय नाहिं ||
गुरु सो प्रीतिनिवाहिये, जेहि तत निबहै संत |
प्रेम बिना ढिग दूर है, प्रेम निकट गुरु कंत ||
गुरु मूरति गति चन्द्रमा, सेवक नैन चकोर |
आठ पहर निरखत रहे, गुरु मूरति की ओर ||
गुरु मूरति आगे खड़ी, दुतिया भेद कुछ नाहिं|
उन्हीं कूं परनाम करि, सकल तिमिर मिटि जाहिं ||
ज्ञान समागम प्रेम सुख, दया भक्ति विश्वास |
गुरु सेवा ते पाइए, सद् गुरु चरण निवास ||
सब धरती कागज करूँ, लिखनी सब बनराय |
सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाय ||
कहै कबीर तजि भरत को, नन्हा है कर पीव|
तजि अहं गुरु चरण गहु, जमसों बाचै जीव ||
सोई सोई नाच नचाइये, जेहि निबहे गुरु प्रेम |
कहै कबीर गुरु प्रेम बिन, कितहुं कुशल नहिं क्षेम ||
तबही गुरु प्रिय बैन कहि, शीष बढ़ी चित प्रीत |
ते कहिये गुरु सनमुखां, कबहूँ न दीजै पीठ ||
सतगुरु सम कोई नहीं, सात दीप नौ खण्ड |
तीन लोक न पाइये, अरु इकइस ब्रह्मणड ||
जेही खोजत ब्रह्मा थके, सुर नर मुनि अरु देव |
कहैं कबीर सुन साधवा, करू सतगुरु की सेवा ||
जग में युक्ति अनूप है, साधु संग गुरु ज्ञान |
तामें निपट अनूप है, सतगुरु लगा कान ||


आपण मोक्षाचे स्थान आहात. ज्या प्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर त्रैलोक्यावर उजेड पडतो त्याप्रमाणे आपल्या बुद्धीतून जे निघते त्यामुळे आमच्यावर प्रकाश पडतो. आपल्या कथा, उदाहरण,  अद्वितीय, उत्तम, पवित्र , उपमारहित आणि अतिकल्यानकारक आहे. ज्या प्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याच्ये कोवळे कोवळे अमृतकण चकोर पक्ष्याची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या मनाची एकाग्रता करून आम्ही आपला अनुभव घेतो. इंद्रियांना नकळत त्याचा अनुभव होतो. तसेच  गांभीर्याने मन स्थिर होते.


ज्या प्रमाणे आपले मुल बोबडे बोलले तरी आईबापांना त्यांचा स्वभावत:च अधिक संतोष वाटतो त्याप्रमाणे माझा अंगीकार केला असून त्या अर्थी आपले म्हटले आहे. त्या अर्थी आमच्यात काही उणे असेल  ते सहज  सहन कराल. परंतु जो अपराध माझ्या  हातून घडतो आहे तो निराळाच म्हणजे मी आपले वर्णन आपल्याबद्दल माहिती सांगू इच्छितो, हे काम फार फार कठीण आहे ह्याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे. बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज काय पडणार ? ज्याप्रमाणे टिटवी  आपली  पिल्ले समुद्रात पडली असता त्यांना काढण्या करिता समुद्र कोरडा करण्याकरिता टिटवी आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्नकरते  त्याप्रमाणे मी अज्ञानी आपले आकलन करावयास निघालो आहे. हे कृत्य खूप अवघड आहे. आपल्या ज्ञानापासून नित्य, नवा आनंद प्राप्त होतो. मी आपल्यापुढे अल्प व मतीमंद आहे. मी आपणास कसा समजून घेऊ ? कोणत्या उपायाने समजून घेऊ ? सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा द्यावा ? स्वामीजी आपण अनुकूल आहात त्याअर्थी एवढे महत्कृत्य करण्याला त्याचाच एक आधार आहे.व त्याचमुळे मला धीर आला आहे. एरवी मी खरोखरच मूर्ख असून अविचाराचीच गोष्ट करीत आहे तरी माझ्यात कमी असेल तर पूर्ण करा व अधिक असेल तर काढून टाका एवढी माझी आपणास  विनंती 


ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेतला असून आज्ञाधारक आहे तरी स्वामीजी तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसा नटवा. स्वामीजी आपण विजयाचे, ज्ञानाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे भांडार आहात. स्वामीजी आम्ही ह्या  संसारात अडकलो आहोत. ह्या मोह , माया बंधनातून आम्हाला काढा. आम्हला श्रीकृष्ण  बनून सदैव मार्गदर्शन करा ( आम्ही अर्जुनाच्या पात्रतेचे नाहीत तरीही ) ज्यामुळे ह्या संसाररुपी  समुद्रातून  बाहेर निघू शकू. आपण जिथे असाल तिथे कल्याण, सुख: , शांती  आहे, स्वामीजी इथे फक्त एक विनंती करतो आपण आम्हाला कधीही दुरावू नका. 


माझ्यात खूप दोष आहेत ते आपण जाणतात आपण आमचे हित जाणतात आपण आम्हाला अंधारातील दिव्या प्रमाणे आहे. आपण आम्हास सदैव पुज्यनिय व आदरणीय आहात आपला कृपाआशीर्वाद कायम कायम असावा हि विनंती.  आपण दयेचा उगम आहात. सर्व गुणांची खाण व विद्येचे अमर्याद सागरच आहत. आपण सर्वश्रेष्ठ आहात. 


स्वामीजी आमच्या मनाची स्थिती बिकट आहे मन भ्रमाने ग्रासून गेले आहे. आमचे हित कशात आहे हे कळत नाही ज्याप्रमाणे तिमिररोगाने नेत्रांची शक्ती जशी क्षीण होते आणि मग जवळ असलेलेही काहीही दिसत नाही त्याप्रमाणे आमची स्थिती आहे. स्वामीजी आपण गुरु, वडील, माउली, कुलदैवत आहत.  जसा सागर कधी नद्यांचा अव्हेर करत नाही तसे गुरु शिष्याचा तसा आपण कधीच आम्हास सोडू नका. आई मुलाला सोडून गेली तर ते कसे वाचेल ? त्याप्रमाणे आपण आम्हास सर्वकाही आहत. आम्ही कधी चुकत असू किवा आमचे बोललेले तुम्हास पटत नसेल तर जी गोष्ट उचित असेल ती सांगा.


आमच्या आयुष्यात तुम्ही अमृतासारखे आहे त्यामुळे आता आम्हास औषधाची गरज नाही.  आपण कृपामृत जलाने आमच्यावर वर्षाव करतात., स्वामीजी आम्ही खुपदा इंद्रियांच्या आहारी जातो कारण अजून पूर्ण तत्व जाणत नाही इंद्रिय मनाला विषयसुख करितात त्यामुळे ते संभ्रमीत होतत. इंद्रिय विषय सेवन करतात त्यामुळे सुख:दु:ख निर्माण होतात ह्याविषय आसक्तीला तोडण्याचा उपाय आपण करावा हि विनंती.  


स्वामीजी आपली कीर्ती अमर्याद आहे व गुणही उपमारहित आहे.आपण गूढ चैतन्य आहात. आपल्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे. आपल्या सारखे आपणच. जसे दगडासारखे परिस काही पुष्कळ सापडत नाही अथवा लेशमात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवियोगच लागतो त्याप्रमाणे आपल्या प्राप्तीने जिचे पर्यवसान होते अशी हि सदबुद्धी फार दुर्लभ आहे. सोनार जसे अशुद्ध सोने अग्नीत ताव देवून शुद्ध सोने निराळे काढतो किवा दही घुसळल्यानंतर जसे लोणी दृष्टीस पडते तसे आपण आम्हास करावे. जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडही सोने होते मग गुरु तर दगडालाही सोने करेल. त्यामुळे आपण आपल्या स्पर्शाने शुद्ध करावे. 


पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किवा वाईट लोकास सारखा प्रकाश देतो तसा जो सर्वांशी सदैव एकसारखे वर्तन ठेवतो त्याप्रमाणे अखंड ममता आणि प्राणीमात्राविषयी सदयता असून ज्याचा मनाची स्थिती कधी पालटत नाही, कधी चांगले प्राप्त झाले तरी आनंदाने गर्व होत नाही व वाईट गोष्टीपासून दु:ख होत नाही असे आपण आहात. आपण हर्षशोकरहित आहत. आपण स्थितप्रज्ञ आहत. आपण सागरा प्रमाणे आहात पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून सागरास मिळतात तरी तो किंचितही वाढत नाही व मर्यादा ओलांडत नाही तसेच उन्हाळ्यात सर्व नद्यांचे पाणी जरी आटले तरी यत्किंचित हि कमी होत नाही तसे आपण आहात.  आपणास रिद्धी सिद्धी काय आल्या व गेल्या याची आठवण सुद्धा आपणास नाही कारण आपण परमसुखात म्हणजे परमात्मसुखाचे ठिकाणी एकाग्र असतात . आपणास स्वर्गसुखाचीहि पर्वा नाही. तिथे रिद्धी सिद्धी चे काय ?


आपण आमच्या सारख्या रोग्यांवर इलाज करतात पण तेही मधुर व रुचकर औषध देऊन ह्यामुळे रोगीहि बरा होतो. आज आपल्यासारखे गुरु मिळाला तर मी माझ्या इच्छा पूर्ण का करू नये ?मला आपण ज्ञान , वैराग्य, भक्ती द्यावी हि नम्र विनंती. आपण माउली आहत. आपण चिंतामणी आहात मग आम्हाला संकट का पडणार ? अमृतसिंधुचे काठी उभे राहून  अमृत न पीता तहानेने तरफडावे ?  तर मग अमृतसिंधूजवळ येण्यात काय श्रम ? कृपया आप एक आवाज द्यावा मला माझे संपूर्ण आयुष्य आपल्या चरणी लीन करायचे आहे स्वामीजी कृपया नाही नका म्हणू मनात आपली ओढ लागली आहे हा जन्म सत्कारणी लागू द्या. आईचे स्तनपान करण्यास मुलाला जशी वेळ, अवेळ ह्याची अडचण नसते त्याप्रमाणे स्वामीजी, कृपानिधे मी तुम्हास माझे इच्छेनुरूप वाटेल ते विचारीत आहे ह्याकरिता आचरण्यास योग्य अशी गोष्ट सांगा. माझ्या योग्यतेनुसार उपासना पद्धती सांगा ज्यायोगे मी त्या परमधामाला  प्राप्त करू शकू. धर्माचे आचरण करणे हाच नित्ययज्ञ आहे पण तो कसा करायचा याचे ज्ञान नाही तरी आपण माझ्या योग्यतेप्रमाणे सांगावे. मलाहि हिमालयात काही महिने, वर्ष राहण्याची इच्छा आहे आपली परवानगी असेल तर योग्य होइल. 


स्वामीजी जीवनाचे उद्देश आताकुठे समजले आहे आणि त्या आत्मसुखाचा शोध घेतोय आपण योग्य गुरु आहात माझ्या करिता. ज्या प्रमाणे दरिद्री माणूस भुकेने व्याकूळ झाल्यवर कोंडा देखील खातो त्याप्रमाणे आम्ही देखील हाच अनुभव घेतला आहे आणि अजून आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला  नाही म्हणून आजपर्यंत इंद्रीयापासून होणार्या विषयसुखात रममाण होतो. आमची स्थिती म्हणजे तहानेने व्याकूळ झालेली  हरणे 
भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाच्या झळानाच पाणी समजून धावतात त्याचप्रमाणे आम्ही आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही व फक्त धावतोय. आता आपण आपली कृपा द्यावी म्हणजे सर्व सुखास पात्र होईल. आपल्या सारखे पवित्र व ज्ञानी असे कोणी दिसतच नाही ज्या प्रमाणे चैतन्य दुसरे नाही ते एकच. आपल्या स्मरणाने मन सर्व विषयाविषयी अनासक्त होते.आपणास पहिल्या बरोबर डोळे शांत होतात व तोंड भरून बोलण्यास  किवा आनंदाने  दृढ आलिंगन देण्यास दुसरे कोण आहे आपणा शिवाय ? आपण शांतीचे ठिकाण आहात तसेच स्फूर्तीस्थान आहात.आपणास पाहताक्षणी वैराग्य दुप्पट होते. आपल्यासमोर बसल्यावर उठू नये असे वाटते. आपणास पाहून मानस संतोष उत्पन्न होतो. आपल्यासमोर बसल्याने पाखंडीच्या मनात हि तपश्चर्या करण्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे आपण आहात.आपण उत्तम, अतिशुद्ध , ब्रम्हानंद आहत.  आपण आत्मस्वरूपाची खरी गोडी लावली, आम्हाला ज्ञानकथेची  आवड त्यावर आपल्यासारखे रसाळ वक्ते तेव्हा आणखी काय पाहिजे.

स्वामीजी आमचे जीवन मोहयुक्त आहे. खरे ज्ञान अजून प्राप्त झालेले नाही पण सुरवात केलीय व आपले मार्गदर्शन खूप प्रेरणादायी ठरते व पुढे अजून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा बाळगतोय व आपल्यामुळे ज्ञानप्राप्ती शक्य संभाव आहे. ती ओढ माझ्यात आहे आपले ज्ञान आमच्या करिता अमृत आहे. आपण आमचे अनुकूल व प्रतिकूल , हित व अहित जाणता. आपण आम्हास जाणता कारण ज्ञानाच्या अभावी आजपर्यंत अंधार होता तो आता आपल्यामुळे हळू-हळू कमी होऊ लागलाय ह्यामुळे श्रद्धेचा मार्ग सुखकर होतोय. आपण खरोखर योगीराज , ज्ञानदीप आहत. आपल्यामुळे ह्या भक्तिमार्गात रसाची गोडी येऊ लागलीय. आपण सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीचे स्थान आहात. आपले बोलणे म्हणजे साखराहून गोड आहे. आपणा ऐकण्याची कायम उत्कंठा असते.

आता मनात एक इच्छा आहे सर्व त्याग करून आपणाकडे यावे म्हणजे पुढचा मार्ग सुखकर होइल. आपण पूज्यनीय चांगला मार्ग कुठला हे आपण  स्पष्ट करून सांगा ( आपण एकदा प्रवचनात म्हटले होते कि सगळे आशीर्वाद मागतात कि माझा मुलगा  डॉक्टर , इंजिनिअर बनावे पण कोणी आशीर्वाद मागत नाही कि माझा मुलगा साधू, संन्यासी, योगी व्हावा पण आज मी हाच आशीर्वाद मागतोय आपण तो द्यावा हि नम्र विनंती ) आपण आम्हास कामधेनुसारखे मिळाले आहात. आपण औदार्याचे भांडार आहात. आपण आम्हास अजून ज्ञान द्यावे. आपला सहवास द्यावा जेणेकरुन जीवनातील्कलोख नाहीसा होइल. आपण अद्वितीय ब्रम्ह आहात. आपण समदृष्टी आहत. ह्या जन्मात आपण आम्हास भेटले आम्ही धन्य झालो.( बहुता सुकृताची जोडी | म्हणुनी स्वामीजी  आवडी || )


आपली थोरवी काय वर्णावी जेवढी वर्णावी तेवढी कमीच. जसे तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरिता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे व ते चाखून पाहतो तो ते अमृतच त्याप्रमाणे आपण परमतत्वच आम्हाला प्राप्त झाले आहे. क्षीरसागराचे मंथन केल्यानंतर अमृत प्राप्त होते परंतु आम्हास काही दैवी योग जुळून आलाय कि काही न करता अमृताची प्राप्ती झालीय. स्वामीजी आपले आपल्या मृदुपणाने स्वप्तसुरापासून  होणारा आनंदही कमी भासेल ह्या गोदीच्या आशेने कानालाच जिव्हा फुटतील व इंद्रिय आपापसांत भांडण करू लग्तिल. आपले बोल हि प्रत्यक्ष रुपाची खाणच आपणाकडे आहे. आपल्या शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे. आपल्या बोलण्याने आम्हास मोक्षरस  मिळतो जो नकळत इंद्रियांना मेजवानीचे सेवन करितो. आपण ज्ञानसूर्य आहात जो कधी मावळत नाही. आपल्या नुसत्या नावापुढे गगन तुच्छ दिसते.



आता आपण माझ्या अंगी योग्यता येईल एवढे आपण काय कराल कृपया सांगावे. मी अज्ञानरूप सर्व मार्ग सोडून आत्माबोधांच्या सरळ मार्गांनी धाव घेतली आहे. स्वामीजी आपण आम्हास शास्त्र शिकवावे व ते लवकर सांगावे हि मनापासून इच्छा कारण उत्कंठारूप  समुद्रात बुडालेलो मी मग मला वर काढा. आपल्यावर मन एकाग्रकरीता आत्मसुखाचा आता अनुभव येऊ लागलाय तसेच अहंभाव नाहीसा होतो, सात्विकभाव  आता निर्माण होतो आता आपण आमच्या बुद्धीला आश्रय द्यावा हि विनंती. आपण सांगितल्या प्रमाणे (  भगवद गीता ६.३५ ) मनाचा एक चांगला गुण आहे त्याला चातक लागेल त्या ठिकाणी राहावयास हे सोकावते म्हणून याला कौतुकाने आपण आत्मसुख दाखवावे.  आपणासारखे सामर्थ्यवान  कोणी नाही. मोक्ष प्राप्तीकरिता भक्तियुक्त अंत:करणाने जाऊ इच्छितो. इंद्रीयरूपी गावाहून निघून मोक्षरुपी गावास जाण्याकरिता मी भक्तिरूपी मार्गास आता आलो आहे. आता झपाट्याने अभ्यास करून दिवस ( आयुष्य ) मावळण्यापुर्वि  हा मोक्षप्राप्तीचा गावाला पोहचायचे आहे तरी आपले मार्गदर्शन, कृपाआशीर्वाद आवश्यक आहे.  स्वामीजी आपण योगी ( योगी म्हणजे देवांचा देव, सर्व सुखाचे आगर ). स्वामीजी मी समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरीही आपली  महिमा लिहून पूर्ण होणार नाही.



स्वामीजी आपण इंजीनियर आहात कि ज्योतिष कि डॉक्टर कि इतिहासकार कि अजून काही पण थोडक्यात सांगायचे तर आपण माझ्या करिता साक्षात कृष्ण , शिव आहात. स्वामीजी आपली एक खासियत आहे कि आपण अगदी गहन विषय सहज सांगतात तसेच आपले सूक्ष्म परीक्षण आपल्या बोलण्यातून जाणवते मग कधी जाणवते आम्ही काय ह्या जगात आंधळे आहोत जे अजून हे समजत नाही. आपण खरोखरीच महान आहात. 
थोडक्यात न भूतो न भविष्यती..... 


गुरु माउली,ज्ञानाची साउली

विद्येचे माहेर असे गुरु
परब्रम्ह गुरु, कल्पतरू गुरु
विद्येचा सागर असे गुरु
गुरु महान, गुरु कृपासीन
जीवन व्यर्थ असे गुरुवीन
सदा पाळावे गुरुचे वचन
वंदावे चरण गुरुचे
गुरुकृपे घडले शिवाजी, अर्जुन
तुका, ज्ञानेश्वर, राम-लक्ष्मण
गुरुविना नाही कोणी महान
गुरु ईश्वर, गुरु परमेश्वर
गुरुविना नाही जगी कुणा मोक्ष
अज्ञानांना दावित असे प्रकाश
गुरुपुढे ठेंगणे आकाश
ठेवितो माथा गुरुचरणी

स्वामीजी आपणा बद्दल बोलयला शब्द कमी पडतात काय लिहावे ते हि सुचेनासे झाले. थोडक्यात आपला जन्म हि दिव्य आणि कर्म हि दिव्य आहे. आपणाकडून शिकण्यासारखे खूप खूप आहे. मी असेच मानतो  कि पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि स्वामीजी आपण माणूस नाहीत आपण प्रत्यक्ष कृष्ण आहात, स्वामीजी आपण म्हणजे  दयासिंधू. आपले बोलणे कायम हितोपदेशाचे असते. अजून एक बोलावेसे वाटते ते म्हणजे सदगुरू शिष्याचा हित-अहिताचा विचार करून जे हितकार तेच साधकाच्या हाती देतात. परिसाने लोखंडाचे सोने होते, अशाश्वत असे सुवर्ण प्राप्ती होते. परंतु परिस्पर्शाने निर्माण झालेल्या सोन्यात परिसाचे गुणधर्म येत नाही. सदगुरूकृपा  झाल्यास, शिष्यास सदगुरूचा  अधिकार देऊन त्याच्याकडून अनेकांचा उद्धार करवितात. 

आपण मातापित्याहून श्रेष्ठ आहत. जन्मदात्या मातापित्याच्या ममतेशी त्याची तुलना योग्य नाही.  जन्मदाते केवळ इहलोक उत्तम साधावा यासाठी प्रयत्नशील असतात. परत्र सुखाची त्यांना कल्पनाही नसते आणि मायामोहात गुंतल्याने परत्रसुख देण्याची शक्ती त्यांच्यात नसते. आपल्याकृपेने इहपर स्वानंदसोहळा अनुभवून जीवनमुक्ती लाभते. 


स्वामीजी तुम्हासारखी संपन्न माहेरघर असल्यावर आवड म्हणून जी  एक वृत्ती आहे तिचीदेखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची इच्चा तृप्त होते तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्याप्रसन्नतेच्या  मळ्याची थंडगार सावली पाहून, श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. स्वामीजी तुम्ही सुखामृताचे डोह आहात आम्ही आपले इच्छेप्रमाने  त्यात बागडून थंडावा मिळवू असे म्हणतो  तेथेही जर तसे करून घेण्यास तुमच्यशी सलगी करण्यास भिऊ लागलो तर तर आम्ही तृप्त कोठे व्हावे ? बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्या प्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते त्याचप्रमाणे तुम्ही सन्त्जननचि प्रीती कोणत्यातरी रीतीने माझ्यावर व्हावी या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करत आहे. 

चंद्राचे किरण पाहून चकोरपक्षी  जसा आनंदाने डोलू लागतो त्याप्रमाणे आपल्या मुखीचे उत्तर मला अत्यंत सुख देते. आपण आम्हास खरोखरच आनंद  देतात. आपण फक्त एक करावे माझ्याकडे एकसारखे लक्ष्य द्यावे म्हणजे आपल्या कृपादृष्टीने आपोआपच माझे सर्व कार्य शेवटास जाईल


स्वामीजी आपण म्हणजे  तेजाचा तो किरण ज्याने संपूर्ण विश्‍व प्रकाशमान होते. हाच प्रकाश जीवाला अंतर्भूत प्रकाशित करतो आणि जीव प्रकाशमान होतो. आपले शब्द, वागणे, बोलणे म्हणजेच तहानलेल्या जीवाची तहान भागवण्यासारखी आहे. पण ही तहान नेहमी वाढत जात असते, जिला मर्यादा कधीच नसतात. जीवाला एक वेळेस विचारांच्या मर्यादा येऊ शकतात. पण गुरूला म्हणजेच  आपणास  कसल्याच मर्यादा नसतात हे मी जाणतो 

स्वामीजी आपण निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्व मंगल करणारे आहात. तुमचा जयजयकार असो. आपले रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे आहात 

स्वामीजी तुम्ही उपाधिरहित आहात व अविद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्ती आहात.  आपले रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण भक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस आग्याम्य आहत. तुमचा जयजयकार असो. आपण अनेक प्रकारच्या प्रत्ययांनी विशेषणे देण्यास योग्य नाही असे जे सर्व विशेष भावरहित तुम्ही, त्या तुमची स्तुती किती करू ! ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी  ते तुमचे  स्पष्ट  रूप नाही हे मी जाणतो म्हणून तुमच्या ह्या वर्णनाची मला लाज वाटते, मग वर्णन का करिता असे कोणी म्हटले तर माझ्याने राहवत नहि. मीठ  जसे पाण्यात घातल्यावर जसे तद्रूप होते तसा मी तुमचे स्मरण करतो. स्तुतीच्या  निमित्ताने मला वेड लावले आहे. तुम्ही मायबाप आहात असे म्हटले तर स्तुती होणार नाहीच, अन माझ्या लेकुरपनाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागेल. या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढवता येत नाही.  जसा एखादा भ्रान्तियुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे हे वर्णन आहे हे गुरुमाउली, तुम्ही ते सहन करावे.

स्वामीजी आपला जन्म आणि  कर्म हे दिव्य अर्थात  अलौकिक आहे. वाचेने वर्णन करता येत नाही असे आपण आहात

पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि स्वामीजी माणूस नाहीत आपण प्रत्यक्ष कृष्ण आहत. आपण आनंद सागर आहात.....



हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ||

विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड़ी ||
माझी सर्व जोड़ी , हेची माझी सर्व जोड़ी ||
न लगे मुक्ती आणि संपदा II संत संग देई सदा ||

गुरूविषयी जेवढे बोलू तेवढे थोडे असते. गुरू फक्त आणि फक्त प्रेमाची मूर्ती असते.
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥

प.प स्वामीजींना आदरयुक्त नमस्कार करतो व  हे लिखाण  इथेच थांबवतो...